Author: crime aala

दि. ४ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत कारवाई करत ५ लाखांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २.३६ लाखांची रोकड, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.तक्रारदार दीपक शिंदे (रा. वाघोली, पुणे) यांना आरोपींनी ५ लाखांच्या बदल्यात ७ लाख रुपये (१०, ५० व १०० च्या नोटांमध्ये) देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार त्यांना कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले.तक्रारदार ५ लाखांची रोकड घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, स्कॉर्पिओमधून आलेल्या तीन-चार जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. पैसे बदलणाऱ्या इसमाला गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील ५ लाखांची…

Read More

दि.३ कल्याण : धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ ३ कल्याणमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला . पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सण शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ९० फीट रोड, गांधारी, पत्रिपूल या ठिकाणी जागो जागी नाकाबंदी केले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नागरिकांना शांततेत व सुरक्षितरीत्या सण साजरा करण्याचे आवाहन केले.

Read More

दि २ कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी तसेच स्कूल बस चालक-मालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  उपस्थितांमुळे सभागृह भरले होते. “सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा, सुरक्षित प्रवास” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी सकाळी ३.३० वाजता के.सी. गांधी सभागृह, वल्लीपीर रोड, कल्याण (पूर्व) येथे पार पडला. कार्यक्रमात उपप्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांनी “स्कूल बस म्हणजे नेमके काय?” याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्कूल बसची कायदेशीर व्याख्या, आवश्यक कागदपत्रे, शासनाने निर्धारित केलेले सुरक्षा निकष, चालकांची…

Read More

दि. १(डोंबिवली ):डोंबिवली शहर आणि परिसरात अवैध ऑनलाईन लॉटऱ्या जोरात चालू आहेत. पण डोंबिवलीतील स्थानिक पोलीस या अवैध, दोन नंबरच्या धंद्यांकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. दिवस रात्र या लॉटऱ्याच्या दुकानात सामान्य माणसांची गर्दी पाहायला मिळते. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर लॉटरी माफिया शंकर अहुजा याने स्वतःचा अ‍ॅप तयार करून ऑनलाईनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लॉटरीचा गोरख धंदा सुरू केला आहे. यामुळे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवला जात आहे. तर दुसरीकडे लॉटरीच्या माध्यमातून केवळ माफियांनाच फायदा होत असल्याने लॉटरी खेळणारी अनेक कुटुंब देशोधडीला लागत चालली आहेत. राज्यात ऑनलाइन लॉटरीवर बंदी असतानाही, त्यात मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तरीही मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत…

Read More

पोलिस–प्रतिष्ठानच्या संयुक्त पुढाकारातून ३८५ जणांचे श्रमदान दि. १ (कल्याण) : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत रविवारी सकाळी व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान पार पडले. दि. ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून खडकपाडा सर्कल ते बिर्ला कॉलेज मुख्य रस्ता तसेच खडकपाडा सर्कल ते दुर्गाडी मुख्य रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्त्यांवरील कचरा, प्लास्टिक व इतर घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रांत…

Read More

दि.१ (कल्याण ): कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारणीच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र हरकती नोंदवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते वल्ली एस. राजन यांनी याबाबत आयुक्त अभिजीत गोयल यांना निवेदन सादर करून निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मोबाईल टॉवर उभारणीसाठी महापालिकेची अधिकृत मंजुरी, राज्य शासनाची परवानगी तसेच Department of Telecommunications आणि Telecom Regulatory Authority of India यांच्या नियमांचे पालन अनिवार्य आहे. याशिवाय EMF Radiation Norms, सार्वजनिक सुरक्षितता, अर्बन प्लॅनिंग आणि रोड सेफ्टीच्या निकषांचे काटेकोर पालन झाले आहे का, याबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. सदर ठिकाणाच्या परिसरात शाळा, निवासी वस्ती…

Read More

सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेतेपदी अशरफ ऊर्फ शानू पठाण यांची निवड दि.२३ ठाणे : ठाणे महानगरपालिकाच्या महासभेत आज महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे, तर विरोधी पक्षनेतेपदी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे गटनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.   महासभेत झालेल्या या घोषणेमुळे महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, आगामी काळात सभागृहातील राजकीय रणधुमाळीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते.महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ…

Read More

दि.२३ कल्याण :खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीत भरधाव वेगात स्टंटबाजी आणि रेसिंग करणाऱ्या कारचालकाने अॅक्टिवा चालकाला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी केवळ ४८ तासांत आरोपीस वाहनासह ताब्यात घेत ठोस कारवाई केली आहे.  दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता नवीन वडवली रोड, भंडारी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात अॅक्टिवा  क्र. एमएच ०५ सीएन ०२६३) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अॅक्टिवा चालकाच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमींच्या मुलाने दि. १९ फेब्रुवारी रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.रं.नं. ९१/२०२६ भा.न्या.सं. ११०, २८१, १२५ (अ)(ब) तसेच…

Read More

दि. २३ कल्याण : जय गोस्वामी सामाजिक सेवा संस्था (नोंदणीकृत), मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने होळी स्नेह मिलन उत्सव तसेच समाज कल्याणासाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी, दुपारी २ ते ४ या वेळेत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथील सीआरएम हॉल, अंडर ब्रिज येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि दानधर्माचे महत्त्व यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. “जर पक्षी तुळशी पितो तर नदीचे पाणी कमी होत नाही; जर तुम्ही दान केले तर तुमची संपत्ती कमी होत नाही, रघुवीर तुम्हाला मदत करतो,” या प्रेरणादायी संदेशातून समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित…

Read More

दि.२३ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) चे आयुक्त अभिनव गोयल यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत सुजाण नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात लेखी निवेदन सादर केले आहे. शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम, बकाल रस्ते, आरोग्य सेवेची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील कथित ढिसाळ कारभार यावर संताप व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे.   निवेदनानुसार, केडीएमसीमध्ये निवडणुका होण्यापूर्वी प्रशासक म्हणून कार्यरत असताना आयुक्तांच्या काळात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. उलट नागरी सुविधांचे “तीन तेरा” वाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही, असा दावा करण्यात आला. आरोग्य सेवांबाबतही गंभीर…

Read More