Author: crime aala

डोंबिवली (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र ७११,पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ,लोढाहेवन निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवती अशोक सम्राट,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ एप्रिल ते १६ एप्रिल या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमासह भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लोढाहेवन,निळजे या शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि नातू माननीय आनंदराज आंबेडकर हे पाहिल्यादाच आल्याने आंबेडकरी समाजात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण दिसुन आले शिवाय तिन्ही संघटनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. “आनंदराज आंबेडकरच आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देऊ शकतात…

Read More

कल्याण :कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातासाठी संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. छाया टॉकीज, कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात “काळी-पिवळी” टॅक्सी तसेच खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक, १५ ते २० प्रवासी वाहतूक केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महात्मा फुले चौक परिसरात, वाहतूक पोलीस कार्यालयाजवळच या वाहनांचे उघड थांबे सुरू असल्याने RTO व वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये…

Read More

कल्याण :वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली असून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस उप आयुक्त परि. ०३ कल्याण अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी पोशि/१५२६ सुरेंद्र इंगळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर रॉयल रेसिडेन्सी परिसरात दोन इसम संशयास्पद हालचाली करत असून उभ्या असलेल्या…

Read More

डोंबिवली :विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानकोली ब्रिज परिसरात धोकादायक स्टंटबाजी करून सोशल मीडियावर रील पोस्ट करणाऱ्या तिघा तरुणांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ही कारवाई ७ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश राजू फोंडा रेड्डी (वय २२, रा. राम मंदिर, डोंबिवली पश्चिम), कबीर मच्छिंद्र नेतकर (वय २२, रा. टेल्कोसवाडी, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम) आणि यश नितेश मालवणकर (वय २३, रा. सायली निवास बिल्डिंग, डोंबिवली पश्चिम) यांनी होंडा अ‍ॅक्टिवा (क्र. MH 05 EU 8768) या दुचाकीवर ट्रिपल सीट बसून मानकोली ब्रिजवर धोकादायक पद्धतीने वाहन चालवत स्टंट केले. या प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.ही…

Read More

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पेंढारकर कॉलेज परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली,होती मात्र या कारवाईत फक्त काही मोजक्या हातगाडी व फेरीवाल्यांवरच कारवाई करण्यात आली. याच ठिकाणी फूटपाथवर उघडपणे “ चहा” आणि मोमोचे स्टॉल सुरू असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “फूटपाथ हा चालण्यासाठी की व्यवसायासाठी?” असा थेट सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठराविक स्टॉलधारकांना जाणीवपूर्वक वगळले जात आहे. “यांना वेगळं लायसन्स आहे का? की यांच्यासाठी वेगळाच कायदा आहे?” असा सवाल उपस्थित होत असून, या मागे ‘चिरिमिरी’चा प्रकार तर नाही ना, अशीही…

Read More

डोंबिवली :डोंबिवली परिसरात पोलीस स्टेशनच्या अगदी जवळपास ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत  अनेक वेळा लेखी तक्रारी व अर्ज करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खुलेआम सुरू असलेल्या या लॉटरी अड्ड्यांमुळे तरुण वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक नुकसानाच्या जाळ्यात अडकत आहेत. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच हा व्यवसाय चालू असताना पोलिसांना याची माहिती नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “पोलिसांचा धाक राहिला नाही” अशी भावना परिसरात पसरली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने…

Read More

कल्याण (प्रतिनिधी ): कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कामगिरी करत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला उल्हासनगर येथून अटक केली आहे. या आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी . मोमीन उमर शेख (वय ५९, व्यवसाय – हॉटेल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपले हॉटेल बंद करून घरी गेल्यानंतर २१ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान रात्री अज्ञात आरोपींनी हॉटेलचे शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कम व दोन मोबाईल फोन चोरी केले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

डोंबिवली : कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ ने केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्रांचा मोठा साठा व लाखोंच्या बनावट नोटा जप्त करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असताना सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार डोंबिवली पूर्व येथील दावडी परिसरात राहणारा सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) हा अवैध शस्त्रसाठा बाळगून असल्याची खात्री पटली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीस ताब्यात…

Read More

कल्याण (प्रतिनिधी):कल्याण शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी गंभीर बनल्या असून याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सचिव वल्ली राजन यांनी तहसीलदार कार्यालय, कल्याण येथे निवेदनाद्वारे केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहकांनी बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी काळाबाजार, जादा पैसे आकारणी आणि जाणीवपूर्वक विलंब केल्याच्या घटनाही समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गॅस एजन्सींनी सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, असे आवाहन वल्ली राजन यांनी केले. बुकिंगनुसार वेळेत गॅस…

Read More

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ठाणे पोलिसांच्या स्मार्ट, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवरील विविध शासकीय कार्यालयांचे दोन टप्प्यांत मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) अशा एकूण सात महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता. राज्यातील १२ पोलीस आयुक्तालयांमध्ये झालेल्या या स्पर्धात्मक मूल्यमापनात ठाणे पोलीस आयुक्तालयाने उत्कृष्ट समन्वय, नवकल्पना आणि प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर द्वितीय स्थान मिळवले.या…

Read More