Author: crime aala
सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेतेपदी अशरफ ऊर्फ शानू पठाण यांची निवड दि.२३ ठाणे : ठाणे महानगरपालिकाच्या महासभेत आज महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे, तर विरोधी पक्षनेतेपदी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे गटनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. महासभेत झालेल्या या घोषणेमुळे महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, आगामी काळात सभागृहातील राजकीय रणधुमाळीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते.महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ…
दि.२३ कल्याण :खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीत भरधाव वेगात स्टंटबाजी आणि रेसिंग करणाऱ्या कारचालकाने अॅक्टिवा चालकाला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी केवळ ४८ तासांत आरोपीस वाहनासह ताब्यात घेत ठोस कारवाई केली आहे. दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता नवीन वडवली रोड, भंडारी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात अॅक्टिवा क्र. एमएच ०५ सीएन ०२६३) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अॅक्टिवा चालकाच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमींच्या मुलाने दि. १९ फेब्रुवारी रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.रं.नं. ९१/२०२६ भा.न्या.सं. ११०, २८१, १२५ (अ)(ब) तसेच…
दि. २३ कल्याण : जय गोस्वामी सामाजिक सेवा संस्था (नोंदणीकृत), मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने होळी स्नेह मिलन उत्सव तसेच समाज कल्याणासाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी, दुपारी २ ते ४ या वेळेत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथील सीआरएम हॉल, अंडर ब्रिज येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि दानधर्माचे महत्त्व यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. “जर पक्षी तुळशी पितो तर नदीचे पाणी कमी होत नाही; जर तुम्ही दान केले तर तुमची संपत्ती कमी होत नाही, रघुवीर तुम्हाला मदत करतो,” या प्रेरणादायी संदेशातून समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित…
दि.२३ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) चे आयुक्त अभिनव गोयल यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत सुजाण नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात लेखी निवेदन सादर केले आहे. शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम, बकाल रस्ते, आरोग्य सेवेची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील कथित ढिसाळ कारभार यावर संताप व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, केडीएमसीमध्ये निवडणुका होण्यापूर्वी प्रशासक म्हणून कार्यरत असताना आयुक्तांच्या काळात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. उलट नागरी सुविधांचे “तीन तेरा” वाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही, असा दावा करण्यात आला. आरोग्य सेवांबाबतही गंभीर…
दि.२३ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली इयत्ता ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. २२) सुरळीत वातावरणात पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित या परीक्षेत इयत्ता ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४९ शाळांमधील ४३०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तर इयत्ता ८ वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १९५ शाळांमधील २४३९ विद्यार्थी परीक्षेला बसले. एकूण ६७४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी महानगरपालिका क्षेत्रात २८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. केंद्रांवर देखरेख…
दि :२१ कल्याण : परिमंडळ ३ मध्ये पोलिसांनी मध्यरात्री जोरदार धडक कारवाई करत बार आणि रेल्वे स्टेशन परिसरातील गैरप्रकारांवर मोठा आळा घातला. अवैध प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांना थेट कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील अश्लीलता आणि अनैतिक धंद्यांना थारा दिला जाणार नाही. काल रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रिगल बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच एसीपी सुहास हेमाडे यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी धडक दिली. अचानक तपासणीदरम्यान बारमध्ये तब्बल २३ मुली आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गुंड, API संपत फडोळ, API के. आर. पाटील व इतर अधिकाऱ्यांचा समावेश…
दि.१८ डोंबिवली: उच्च रक्तदाबावर वापरल्या जाणाऱ्या Telma AM (Telmisartan 40mg & Amlodipine 5mg) या औषधांच्या नावाखाली बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मानपाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे ₹८,९४,४०० किमतीच्या २,७९५ स्ट्रीप्स जप्त करण्यात आल्या. तपासात उघड झाले की, आरोपींनी मूळ उत्पादक कंपनीचे औषध असल्याचा भास निर्माण करून “श्रीराम फार्मा” या परवानाधारक मेडिकलमार्फत विक्री केली. औषध बनावट व आरोग्यास अपायकारक असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे. या गंबीर गुन्ह्यात अटकेतील आरोपी पुढील प्रमाणे१)पंकज राधेश्याम उपाध्याय (३३, रा. दावडी, डोंबिवली पूर्व) – डिस्ट्रीब्युटर व मेडिकल व्यावसायिक (अटक: २१…
दि १६कल्याण : कल्याण पूर्व परिसरात वाहनचोरीचे प्रकार वाढत असतानाच कोळसेवाडी पोलिसांनी अतिशय वेगवान आणि अचूक कारवाई करत वाहनचोर टोळीला अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत दुचाकी, स्कूटर व रिक्षा अशी एकूण ३ लाख ४० हजार रुपयांची चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. दि १२ रोजी रात्री १० ते १३ रोजी सकाळी ९ या कालावधीत पत्रीपुलजवळील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला, कल्याण पूर्व येथे रस्त्यालगत पार्क केलेली ७० हजार रुपये किमतीची सुझुकी एव्हेनेक्स मोटारसायकल (MH-05/FU-0658) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी रिक्षाचालक सलमान जाहीद सिद्दीकी (वय २१, रा. वाघमारे चौरे चाळ, पत्रीपुल,…
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लोकल ट्रेनमध्ये तातडीने अतिरिक्त डबे सुरू करा – वल्ली राजन यांची मागणी
दि.१४कल्याण :१२वीच्या परीक्षेसाठी जात असताना गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडून १८ वर्षीय विद्यार्थी स्व. सचिन काथरे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ अपघात नसून, उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची बेफिकिरी उघड करणारी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया वल्ली राजन, राज्य सचिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वल्ली राजन यांनी कल्याण रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन सादर करत परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त लोकल गाड्या तसेच स्वतंत्र, सुरक्षित डबे तातडीने सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी आणि समाजसेवक तोषेश लक्ष्मीपती…
दि.१३कल्याण : महाराष्ट्र पोलीस यांच्या परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत दामिनी पथकाने महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबवत जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत तब्बल १०१३ जणांवर कठोर कारवाई केली आहे. व्हॅलेंटाईन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलींची छेडछाड, अश्लील कृत्ये व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी कडक नजर: पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व डोंबिवली शहरातील मॉल, उद्याने, बाग-बगीचे, निर्जन स्थळे, शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष गस्त वाढविण्यात आली. शाळकरी मुली, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत दामिनी पथकाने संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले. कारवाईचा तपशील जानेवारी २०२६ पासून…
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.