
डोंबिवली (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र ७११,पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ,लोढाहेवन निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवती अशोक सम्राट,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ एप्रिल ते १६ एप्रिल या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमासह भव्य आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी लोढाहेवन,निळजे या शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि नातू माननीय आनंदराज आंबेडकर हे पाहिल्यादाच आल्याने आंबेडकरी समाजात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण दिसुन आले शिवाय तिन्ही संघटनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले.

“आनंदराज आंबेडकरच आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देऊ शकतात अशी लोकभावना यावेळी या कार्यक्रमादरम्यान दिसुन आली.”
विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,त्यागमूर्ती माता रमाई यांचे नातू तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आनंदराजजी आंबेडकर यांनी आपल्या नेतृत्वगुण व कौशल्याच्या जोरावर इंदू मिल ताब्यात घेतली त्यावर न थांबता पुढे जाऊन बौद्धजन पंचायत समिती व पीपल्स एज्युकेशन सोसायटी ताब्यात घेतली व आपण केवळ रक्ताचे वारसदार नसून बाबासाहेबांच्या विचारांचे ही वारसदार आहोत हे पदोपदी सिद्ध केले व असा आदर्श आंबेडकरी समाजासमोर ठेवला असून सद्य परिस्थितीत ते आंबेडकरी समाजाला दिशा आणि मुख्य प्रवाहात आणू शकतात असे जाणकारांचे मत आहे.
मा.आनंदराज आंबेडकर यांनी लोढाहेवन येथील सभा संबोधित करीत असताना अनेक ज्वलंत विषयांवर बोलत असताना इराण इजराईल आणि अमेरिका युद्धावर देखील ताशेरे ओढले शिवाय इराण सारखा छोटा देश असून देखील अमेरिकेला कडवी झुज देत आहे.यावरही खोचक ताशेरे उडविले.त्याचबरोबर वरळी येथील भीम जयंतीला विरोध करणाऱ्याचा देखील भरपूर समाचार घेतला.
सदर प्रसंगी समाजभूषण भगवान साळवी,अनंत पारदुले (अध्यक्ष रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली ग्रामीण २७ गाव),समाधान वानखडे (सचिव,रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली ग्रामीण २७ गाव),आनंद मोहन इत्यादि मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.